काय झालं माहीत नाही,
पण माणसं त्या शहराला
सोडून निघून गेली.
शहर कित्येक वर्षे
ओसाड पडून राहिलं.
असं वाटू लागलं
जीर्ण झालेल्या इमारती
वितळतात की काय
साल्वादोर दालीच्या चित्रासारख्या.
मग
शहराचा जीव
वाचवायचा म्हणून
झाडांनी
सर्व इमारतींना
फोटोसिंथेसिसचं तंत्र शिकवून टाकलं